भरत आली वही सरत आली शाई माझ्या मनातल्या भावनांना मात्र अंत नाही. © दिपक पाटील.
व्यक्ती डोळ्यातलं पाणी आटवायला, अपमान पचवायला, प्रत्यक्ष कृतीतून बोलायला, उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघायला आणि चेहर्यावरचे भाव लपवायला शिकली मग ती माणूस होत आहे असं समजावं...
© दिपक पाटील
शब्द पेरला मातीत माती धरली मुठीत मुठीमधल्या मातीत काव्य स्फुरले प्रितीत
© दिपक पाटील.
भरपूर वाचल्याने कधीच अक्कल येत नसते.वाचल्या गेलेल्या गोष्टीवर चिंतन-मनन झाल्यावर/केल्यावर खरी अक्कल येते.
जीवनाचा प्रवास श्वास संपेपर्यंत थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारणं बदलतात. प्रवास चालूच असतो;
अभ्यासापेक्षा स्वतः वर वेळ आल्यावर 'संविधान' व 'मानवाधिकार'जास्त कळायला लागतात.
असं वाटतं, भेट ठरलेली असते फक्त वेळ व ठिकाणं बदलतात आणि कधी कधी माणसंही...!!!