Saturday 17 March 2012

श्रावणातल्या आठवणींच एक पान...


पुस्तकात  दुमडुन  ठेवलय  आठवणींच एक पान
शब्द खुप सुंदर होते लिहलेले होते खुप छान,
शब्दांमध्ये होता गोड गुलाबी थंडीचा गारवा
खळखळत होते झरे बहरत होता निसर्ग हिरवा,
चिमण्यांची होती चिवचिव
कावळ्यांची कावकाव,
पोपट करत मिठूमिठू
नुकताच लागलेला होता श्रावण  ऋतू,
मोर  पिसारा फुलवून नाचत होता
कोकिळा मंजूळपणे गात होती,
चिखलात कमळ उमलत होते
कस्तुरी सुगंध दरवळत होता ,
वाऱ्याची मंद झुळूक मनाला छेडत होती
बरसणारे  मोती पापण्यांवर दाटत  होते ,
लहान मुलं कागदाच्या होड्या बनवत होती
मोठी मोटारगाड्या  फिरवत होती ,
शिवारात पिके डोलत होती
अगोदर तीही थेंबापायी आसुसली होती
कुणब्या खुश होता उसाला चांगला भाव होता ,
कोवळ्या उन्हाच्या सारी पडत होत्या
डोंगरच्या मध्यस्ती इंद्रधनु रंग उधळित होता ,
हे कोवळे उन चौफेरी पडत होते
आणि दुमडून ठेवलेले आठवानींचे पान सरत होते 

© दिपक रा.पाटील.






Sunday 4 March 2012

कोण म्हणतं मी कविता करतो?...


कोण म्हणतं मी कविता करतो
मी फक्त मनातल्या सत्य वाचनाला, तत्वाला,
हृदयाच्या खऱ्या स्पंदनाना कागदावर आरामात मांडतो,

कोण म्हणतं मी कविता करतो
माझ्या आणि तुमच्या भावनांचे ओझे मी एकटा वाहतो
आणि तुमच्यासमोर पुस्तकात काव्यरुपात जन्मतो,

कोण म्हणतं मी कविता करतो 
मनाला उधाण होऊन आकाशी,रानोवनी, सागर किनारी भटकू देतो
आणि तिथलं सौंदर्य शब्दांसवे घेऊन येतो,

कोण म्हणतं मी कविता करतो
अबोल वाऱ्याचे,गंधफुलांचे,पावसाच्या सरींचे,चिमणपाखरांचे,सरत्या सांजेचे,
सुर्यास्ताचेमाझ्या परीने कौतुक करतो,

कोण म्हणतं मी कविता करतो
मी प्रेमयुगुलांचा विश्वास जिंकून त्या दोन शरीरांचा
एक श्वास होण्याचा प्रयत्न करीत असतो,  
  
कोण म्हणतं मी कविता करतो
मी कविता वैगेरे करीत नाही मी माझ्या आत्म्याला
तुमच्या आत्म्याशी एकरूप करीत असतो......................© दिपक राजेन्द्र पाटील