Tuesday 17 January 2017

फेसबूक स्टेटस...

१.निवडणूकीत ठराविक जनतेची मतं नाहीतर मनं विकत घेतली जातात.

२.आज भारतात राहिल्याचा खरा अभिमान वाटतोय.सर्व वर्गाच्या (category) लोकांसाठी नोटा बदलवण्यासाठी बँकेत एकच रांग.

३.विचार 'मर्सिडीज' च्या पातळीचे असले की मग सायकल वर फिरतांना ही स्वत:चा अभिमान वाटतो व कुठलाही कमीपणा वाटत नाही.

४.डि.जे.वाजतांना जेवढा त्रास होत नाही तेवढा थंडी वाजल्यावर होतो.

५.प्रत्यक्ष भेटल्यानंतरच्या संवादात जो आनंद आहे तो अप्रत्यक्ष संवादात नाही.
उदा. अप्रत्यक्ष  - फेसबुक ,whatsapp,sms

६.अभ्यास मनापासून केला तर यश मिळतं प्रेमाचही तसच असतं.

७.ती असली की दररोज दिवाळी वाटते ती नसली की दिवाळीत ही दिवाळी नाही.

८. मी मंदीरात जात नाही मला देण्याची सवय आहे.

९.जीवन म्हणजे सुखद अन् दुखद अनुभवाचं कलेक्शन.

१०.बुद्धिमान व्यक्तीला जात लागत नाही तो सर्व संकटांवर मात करतो.आपण सगळे एक आहोत. मनुष्य ही एकच जात आहे या पृथ्वीतलावर.

११.भ्रष्टाचाराने काही लोक श्रीमंत होत असतील पण राष्ट्र दारिद्र्य रेषेखाली जाते.

१२.दगडावर फुलं वाहून व दोन-चार मंत्र म्हणून पुजारी बक्कळ कमवतात आणि दुसरीकडे 200-400 रू .साठी छिन्नी -हातोड़े घेउन जाते बनविणारे गरीब बिचारे ,राबणारे

१३.काही उच्चशिक्षित व भरपूर पगार असणारे लोक अजुन जास्त हुंडा मागतात. कदाचित शिक्षण हे त्यांनी हुंडा मिळवण्यासाठी घेतले असावे.अशांना उच्चशिक्षित भिखारी म्हणन्यास काही हरकत नाही.

१४.भारत माझा देश आहे मारत माझा देश आहे...

१५.काही लोक दीड दिवसांचा गणपती घरी बसवतात आणि म्हणतात
"गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या"

© दिपक रा. पाटील

No comments: